अहमदगर: पोलीस वृत्त ऑनलाइन: धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नानंतर तीन महिन्यात हातावरची नवदाम्पत्याला जिवन संपाविले आहे . सुखी संसाराची स्वप्न रंगवण्याच्या काळा नवदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयानं संपूर्ण गावं हादरलं

आहे.नवदाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले.मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर येथे वैभव आमले आणि स्नेहा आमले असं दोघांची नावं असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरू केला आहे. तीन महिन्याआधीच विवाह झाला होता. पुण्यात नोकरी करत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही आपल्या गावी साकूरला आले होते. वैभव दत्तात्रेय आमले वय वर्ष 22 व स्नेहा वैभव आमले वय वर्ष 20 या नवविवाहीत दापत्यांनी रवीवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही.

