अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी नवलनगरजवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर चारजण जखमी झाले.

अधिक माहिती अशी की- नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४- एफझेड ३६८९) अमळनेरकडे येत होता. वेगाने येणारी कार अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) अशी मयतांची नावे आहेत.या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.
अपघात काल शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नवलनगरजवळ झाला.

