महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आता राज्यात पुन्हा हवामाखात्याने यलो अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्याना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.


