• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

वानराच्या मृत्यूने तळवाडे गाव शोकाकुल; विधीवत अंत्ययात्रा व १२ दिवसांचे सुतक पाळले

policevrutta by policevrutta
September 17, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज
तालुक्यातील तळवाडे गावात मागील चार महिन्यांपासून मुक्काम ठोकून राहणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून संपूर्ण गावाने १२ दिवसांचे सुतकदेखील पाळले आहे.
चार महिन्यांपूर्वी नर व मादी अशी दोन वानरे तळवाड्यात आली होती. सुरुवातीला गावकऱ्यांना त्यांची भीती वाटत होती, मात्र नंतर त्यांच्याशी स्नेह जडला. गावातील प्रत्येकजण त्यांना खाऊ घालत असे. वानरे घरांवरून, झाडांवरून, पाण्याच्या टाकीवरून उड्या मारत असत आणि त्यामुळे मुलांनाही गंमत वाटत असे.
१२ सप्टेंबर रोजी एक वानर पाण्याच्या टाकीवर चढले असताना अचानक खाली पडले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. गावकऱ्यांनी तातडीने झाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले, मात्र उपचाराआधीच वानराचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी त्याची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. डोली सजवून, वानराला स्नान घालून तिरडीवर ठेवण्यात आले. गावात रांगोळ्या काढण्यात आल्या, फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि वाजतगाजत वानरराजाला निरोप देण्यात आला. धीरज रामकृष्ण पाटील व योगेश पवार आगारी झाले तर रोहिदास हिरामण पाटील, भटू देविदास पाटील, संजय शालीक पाटील, संदीप रवींद्र पाटील व स्वप्नील छोटू पाटील यांनी खांदेकरी म्हणून जबाबदारी सांभाळली. पूजा व विधीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्याप्रमाणे कुटुंबातील कोणी सदस्य गमावला तर घरातील महिलेला दुःख देतात, त्याचप्रमाणे वेणूबाई पाटील यांनी दुःख स्वीकारले. परंपरेनुसार भावकी १२ दिवस त्या कुटुंबाच्या घरी जेवायला येते. तसेच गावकरीही मंदिरावर एकत्र जेवले. गावाने १२ दिवसांचे सुतक पाळले असून २२ रोजी दशक्रिया विधी तर २४ रोजी उत्तरकार्य व गंधमुक्तीचा कार्यक्रम होणार आहे.
या प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी दुःख व्यक्त केले. पं.स.चे माजी उपसभापती भिकेश पाटील यांनीही अंत्ययात्रेला हजेरी लावली.

Previous Post

शिक्षण क्षेत्र हादरले: शालार्थ आयडी घोटाळ्यातील ६३२ शिक्षकांवर झाडाझडती सुरू

Next Post

ग्रामसभा विरळ, सरपंच-उपसरपंच उपस्थित, बाकी सदस्य कुठे गेले?

policevrutta

policevrutta

Next Post
ग्रामसभा विरळ, सरपंच-उपसरपंच उपस्थित, बाकी सदस्य कुठे गेले?

ग्रामसभा विरळ, सरपंच-उपसरपंच उपस्थित, बाकी सदस्य कुठे गेले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!