• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल – जाणून घ्या सविस्तर

policevrutta by policevrutta
November 14, 2022
in Uncategorized, राज्य, शैक्षणिक
0
राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल – जाणून घ्या सविस्तर
0
SHARES
363
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती करताना सर्वांना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीत नवीन सुधारणा केल्या आहेत.

राज्यात शिक्षकांची भरती करण्यासाठी सरकारने ‘पवित्र’ पोर्टल सुरु केले असून शिक्षक भरती करण्यासाठी पोर्टल मध्ये काही बदल करण्यात आले , तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत गुण सुधारण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त पाच वेळा संधी दिली जात होती,आता त्यात नवीन नियमांची भर पडली.

पाहूया काय आहेत शिक्षक भरतीचे नवीन नियम !

आता उमेदवाराला प्रत्येक वेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागेल.

आधीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल.

2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल केले आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी उमेदवाराने किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे, चाचणीसाठी उमेदवारांनी निवडलेले माध्यम केवळ त्या चाचणीसाठीच असेल.

चाचणीनंतर भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती देण्यात येतील,पात्र उमेदवारांसाठी एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांना व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर, उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र असेल.

Previous Post

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी..

Next Post

जळगाव…! डंपरच्या धडकने बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ बचावला

policevrutta

policevrutta

Next Post
जळगाव…! डंपरच्या धडकने बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ बचावला

जळगाव...! डंपरच्या धडकने बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ बचावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!