अंमळनेर (पोलीस वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त यावर्षी हर घर तिरंगा या अभियानात प्रत्येक गावात ,गल्लीत ,घरात.भारताच्या तिरंगा ध्वज येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरात किंवा परिसरात तिरंगा फडकवायचा आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना आपल्या देशाची प्रति आत्मियता देशाविषयी प्रेम एकूणच देशभक्ती जागृत करण्याचा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे .स्वातंत्र्यानंतर आजच्या ७५ व्या अमृत महोत्सवी भारत एक प्रगतिशील राज्य राष्ट्र देश बनला आहे .या ७५ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने भारतातील प्रत्येक नागरिक भारतीय ध्वज हातात घेऊन आपला विकासाचा झेंडा अभिमानाने हातात घेऊन फडकविणार आहे. यामुळे . पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आपण केलेली. प्रगतीचा एक जल्लोष म्हणून आपण हे हर घर तिरंगा अभियान राबविणार आहोत. त्यात आपण ही या तिरंगा अभियानात सहभागी होऊन जोश, उत्सव ,आनंद वाढवा.

आज सामाजिक व खेड मंत्रालय विभाग अंतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत अंमळनेर शहरात हर घर तिरंगा अभियान जनजागृती करण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक वैशाली दिपक पाटील अमळनेर ब्लॉक यांनी राष्ट्रीय सेवा योजना या विभागात अंतर्गत हा तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये कॉलेज ,शाळेतील विद्यार्थी इतर आदींचा सहभाग होता.

