रेल्वेचे तिकीट नेमके कसे ठरवले जाते ! – जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट

अशी कुठलीही व्यक्ती नसेल ज्यांनी रेल्वेचा प्रवास केला नसेल – मात्र रेल्वेचे तिकीट कसे ठरवले जाते – याबाबत प्रत्येकाला प्रश्न पडला असेल
याविषयी आपण आजच्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ – यामध्ये आपण भाड्याचा निकष आणि किलोमीटरनुसार फरक , या दोन गोष्टी जाणून घेऊ
भाड्याचा निकष कसे ठरते
● तसे पाहिले तर भारतीय रेल्वेद्वारे विभिन्न प्रकारच्या रेल्वे धावतात -6 स्लीपरमध्ये कमी तर एसीमध्ये अधिक भाडे आकारले जाते – सुविधांनुसार भाडे दरात कमी अधिक प्रमाण दिसून येते
● विशेष रेल्वे गाड्यांमध्ये गरीब रथ, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, इत्यादी ट्रेन यांचा समावेश होतो.
● याव्यतिरिक्त रिझर्व्हेशन शुल्क, केंद्रीय कर, यांचा देखील समावेश होतो – या सर्वांच्या एकत्रिकरणातून रेल्वेच्या भाड्याचा दर ठरविला जातो
किलोमीटरचा फरक
● रेल्वे तिकीटात किलोमीटरनुसार फरक खूप महत्वाचा असतो – किलोमीटर च्या वेगळंवेगळ्या श्रेणी राहतात , यामध्ये 1-5 किलोमीटर साठी वेगळे भाडे राहते तर पुढे 6-10, 11-15, 16-20, 21-25 पासून शेवटी 4951-5000 पर्यंत समाविष्ट आहे – आता यामध्ये तुमचा प्रवास ज्या श्रेणीत समाविष्ट असेल – त्यानुसार शुल्काची आकारणी केली जाईल.

